शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

जातींच्या नावाचे महासंघ निषेधार्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:56 IST

कोल्हापूर : अलीकडे ब्राह्मण, मराठा, ओबीसी, दलित या जातींच्या नावाने स्थापन झालेले महासंघ हे निषेधार्हच म्हणावे लागतील. यामधून जातीयवाद निकाली निघणार की वाढणार हा प्रश्न उपस्थित होतो, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी येथे व्यक्त केले.शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे बुद्धपौर्णिमेनिमित्त आयोजित आठव्या प्रबोधनवादी साहित्य संमेलनाच्या ...

कोल्हापूर : अलीकडे ब्राह्मण, मराठा, ओबीसी, दलित या जातींच्या नावाने स्थापन झालेले महासंघ हे निषेधार्हच म्हणावे लागतील. यामधून जातीयवाद निकाली निघणार की वाढणार हा प्रश्न उपस्थित होतो, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी येथे व्यक्त केले.शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे बुद्धपौर्णिमेनिमित्त आयोजित आठव्या प्रबोधनवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती लेखक डॉ. आनंद पाटील, कार्याध्यक्ष डॉ. जे. बी. शिंदे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई, साहित्यिक लक्ष्मणराव मोहिते, व्यंकाप्पा भोसले, मीरासाहेब मगदूम, प्राचार्य दिनकर खाबडे, डॉ. टी. एस. पाटील, सुनीलकुमार सरनाईक, हसन देसाई, पी. बी. पवार, आदींची होती. डॉ. आनंद पाटील यांच्याहस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन झाले.सबनीस म्हणाले, अलीकडे देशाला हिंदुत्ववादाचा धोका निर्माण झाला आहे का?, सर्वच जाती-धर्मांत कट्टरवाद आला आहे का?, भारताची व महाराष्टÑाची सांस्कृतिक एकात्मता धोक्यात आली आहे का? हे पाहण्याची वेळ आली आहे. डॉ. आनंद पाटील म्हणाले, लहानपणापासूनच मुलांवर बाराखडीमधून वर्णव्यवस्था बिंबवली जात आहे. समानतेसाठी विविध देशांत क्रांती झाली पण भारतात होऊ शकली नाही, कारण इथे कोणाला वैदिक चौकट पार करता आली नाही. जे. बी. शिंदे म्हणाले, बुद्धांच्या मानवतावादी विचारांच्या मनन, चिंतन व अनुकरणासाठी गेली आठ वर्षे हे संमेलन आयोजित केले जात आहे. देसाई, मोहिते, प्रा. शिंदे यांनी विचार मांडले. राजेंद्र यादव यांनी सूत्रसंचालन, विशाखा जितकर यांनी आभार मानले.शासकीय पुजारी नियुक्तीचा अभिनंदनपर ठरावकरवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात शासकीय पुजारी नियुक्त करण्याचा कायदा सरकारने मंजूर केला. यासाठी लढा दिलेल्या कार्यकर्त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्याचबरोबर हाच कायदा महाराष्टÑातील इतर मठ व मंदिरांना लागू करून जमलेल्या पैशांतून समाजहिताची कामे करावीत यासह विविध आठ ठराव जे. बी. शिंदे यांनी मांडले. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.यांचा झाला गौरवसंमेलनात डॉ. जयश्री चव्हाण, गुलाब अत्तार, अशोक चौगुले, बाबूराव शिरसाट यांचा प्रबोधन पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.